Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. -...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८० टक्के अनुदान जमा झाले.यामुळे माझ्या शेतातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे,” असा आनंददायक अनुभव कुरखेडा तालुक्यातील बांधगाव येथील लाभार्थी शेतकरी प्रेमानंद तागडे यांनी व्यक्त केला.
  • लाभार्थीच्या शेतात थेट पोहोचले कृषी अधिकारी👇
कुरखेडा तालुक्याच्या बांधगाव येथील प्रेमानंद तागडे यांनी पोकरा योजनेअंतर्गत सिंचनासाठी पाईपचा लाभ घेतला होता.या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लाभार्थीच्या शेतातील सद्यस्थिती पाहण्यासाठी जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पथकाने तागडे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.योजनेचा लाभ थेट आणि अत्यंत वेगाने मिळाल्याबद्दल प्रेमानंद तागडे यांनी प्रशासनाचे आभार मानत तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनाही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
  • इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत: PCBDC प्रणाली उपयुक्त👇
यावेळी लाभार्थीच्या शेताला भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरवळकर यांनी सांगितले की,गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५३२ गावे या प्रकल्पात समाविष्ट असून कुरखेडा तालुक्यातील ३७ गावांमध्ये योजना वेगाने सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सुरुवातीला स्वतःची गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतात,त्यांच्यासाठी PCBDC (Post-Clearance Beneficial Direct Credit)हा नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना सुरुवातीला केवळ १० टक्के रक्कम भरावी लागते.उर्वरित रक्कम चलनाद्वारे खरेदी करून अनुदानातून थेट भरली जाते,ज्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो.मंडळ कृषी अधिकारी अमोल जनबंधू व उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रेमानंद तागडे यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही अर्ज केल्यानंतर त्यांना त्वरित मंजुरी देऊन थेट खात्यात सबसिडी हस्तांतरित केली जात आहे.ट्रिप,स्प्रिंकलर(तुषार सिंचन), एचडीपीई पाईप यांसारख्या सिंचन घटकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा(पोकरा)लाभ घेऊन प्रेमानंद तागडे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात सिंचनाची सोय करावी,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने प्रीती हिरवळकर(जिल्हा कृषी अधीक्षक,गडचिरोली),रूपाली जाधव(तालुका कृषी अधिकारी,कुरखेडा),बी.कुलसंगे(सहाय्यक कृषी अधिकारी,कुरखेडा),रामटेके(मंडळ कृषी अधिकारी, कुरखेडा),अमोल जनबंधू (मंडळ कृषी अधिकारी, कुरखेडा)यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!