Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे 'नाट्यश्री' चे बहारदार कवी संम्मेलन संपन्न….

गडचिरोली येथे ‘नाट्यश्री’ चे बहारदार कवी संम्मेलन संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवी “ऊर्मी”कार प्रभाकर तांडेकर “प्रदत्त” यांच्या अध्यक्षतेखाली,प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र कांबळे यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले.  प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी चरणदास वैरागडे,  दादाजी चुधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 कवि संमेलनात विदर्भातील एकूण ७८ कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.सामाजिक आशयाच्या,विषयाच्या व चळवळीच्या विविध कवितांनी संमेलनात चांगली रंगत आणली.गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रसिद्ध कव्वाल व गझलकार वामनदादा गेडाम यांच्या गझलेने संमेलनाची रंगतदार सुरुवात झाली.तर पराग दडवे या कवीच्या ‘प्रेम, अध्यात्म आणि मी’ या कवितेने प्रेमाची एक वेगळीच ओळख रसिकांना करुन दिली.सिंदेवाहीच्या प्रिती ईश्वर चहांदे या कवयित्रीने “दुःख” कविता सादर करून आपल्या ह्रदयाची बोच प्रगट केली तर डॉ. प्रविण किलनाके यांनी “मोडून पडलेला औत” द्वारे शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडली.कुरखेडाच्या कु. विधी भास्कर बन्सोड या बालकवीने “वेळेस माझी वाट आहे” या कवितेतून आशावाद प्रगट केला. मुलच्या प्रब्रम्हानंद मडावी या कवीने “नाती” कवीता सादर करून आदिवासींच्या वेदना मांडल्या. इंजि. विजय मेश्राम यांनी “असे वाटते” म्हणत रसिकांची वाहवा मिळवली,तर भिमानंद मेश्राम यांच्या ‘विशवगुरु’ या कवितेने संमेलनास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.आरमोरीच्या ज्योती म्हस्के यांनी ‘ समाजाच्या नपुंसकते’वर आघात केला.डॉ.चंद्रशेखर बांबोळे यांनी ‘घेतले वाटून त्यांनी’, म्हणत समाजाच्या दांभिकतेवर हल्लाबोल केला.मुलचेरा येथील प्रभाकर दुर्गे यांची ‘श्वासातून फुटल्या आर्त किंकाळ्या ‘ मनिषा हिडको या आदिवासी कवयित्रीची ‘जननी’ सुजाता अवजट यांची ‘मैत्री’, सोपानदेव म्हशाखेत्री यांची ‘जगण्यास अर्थ आला’, पुरुषोत्तम ठाकरे यांची’सकाळी सकाळी ‘ स्वप्नील बांबोळे यांची ‘व्हा चोर इथे ‘ उपेंद्र रोहनकर यांची ‘माही माय’, सुनिता तागवान यांची ‘नशिब’,खेमदेव हस्ते यांची ‘रान पेटत आहे ‘, योगेश गोहणे यांची’संत गाडगेबाबा ‘  संगीता ठलाल यांची’कोंड्याची राख’, देवेंद्र मुनघाटे यांची लोकप्रतिनिधींचे चिमटे घेणारी ‘आजचा पुढारी’, तर प्रमुख अतिथी चरणदास वैरागडे यांच्या ‘व्यथा शेतकऱ्याची’ या आशयगर्भ कवितेने रसिक भारावून गेले. डॉ.गुलाब मुळे यांच्या ‘गुस्ताखी माफ हो ‘ व दिनेश देशमुख यांच्या ‘आश्वस्त हो’ या विनोदी कवितांनी रंगत आणली.’नाट्यश्री’ चे कवि संमेलन निखळ आनंद देणारे असते.दर्जेदार कवितांचा आस्वाद या संमेलनातून घ्यायला मिळतो.समाजाला दिशा देणारे हे कवीसंमेलन आहे’ असे प्रतिपादन  संमेलनाध्यक्ष प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी  काढले. ‘विविध स्तरावरील समस्यांना वाचा फोडणारे, आदिवासी व मागासवर्गीयांच्या समस्या मांडणारे कवी संमेलन आहे’ असे मत प्रमुख अतिथी राजेंद्र कांबळे यांनी मांडले.या कवी संमेलनात संगीता रामटेके, सुनीता तागवान,कु.भाग्यश्री बन्सोड, सौ.ज्योत्स्ना बन्सोड,तुळशीराम उंदीरवाडे, प्रदीपकुमार साखरे, निळकंठ रोहनकर, मिलिंद खोब्रागडे, पुजा गिरी, वंदना मडावी, प्रतीक्षा कोडापे, वर्षा पडघन, गजानन गेडाम, खुशाल म्हशाखेत्री, दिनेश देशमुख, वसंत चापले, अहिंसक दहिवले, लता शेंद्रे, केवळ बगमारे, विजया पोगडे, प्रकाश मारभते, सुरेखा बारसागडे, सोमनाथ मानकर, सुनील मंगर इत्यादींसह ७८  कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या.

कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेंद्र गोहणे यांनी केले.सोबतच प्रत्येक कवींचा थोडक्यात साहित्यिक परिचय करून दिला. अरुण बुरे यांनी अभिप्रायांचे वाचन केले.सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.अरुण बुरे, दिलीप मेश्राम, वसंत चापले, गजानन गेडाम, राजू चिलगेलवार,राजेंद्र जरुरकर,दादाजी चुधरी,चुडाराम बल्हारपुरे(संचालक) व दै.देशोन्नतीचे उपसंपादक नरेश बावणे यांनी विशेष मेहनत घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!