Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीअंगावर विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू..-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घटना..

अंगावर विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू..-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी पर्यंत) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दिनांक-६ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती.त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ,वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.अशातच आज सायंकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यात पावसा बरोबरच विजांचे कडकडाट होऊ लागले.अशातच चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन गावातील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) गावातील वैभव चौधरी यांच्यावरही वीज कोसळली.वीज कोसळल्या नंतर रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तर तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज कोसळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!