उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही ‘जुनं ते सोनं’ अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात एकेकाळी मातीच्या तेलाचा (रॉकेल/केरोसीन)दिवा तयार करून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करीत अनेक विद्यार्थी घडलेत. झगमगत्या दुनियेत तो क्षण आजही स्मरणात असून त्याची जोड आता अनेक कुटुंबियांच्या नजरेस पडणार आहे.अश्यातच आता रॉकेल वितरणाबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका तीन लिटर रॉकेल मिळणार असून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यासह,उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह)तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.तालुकास्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार,पुरवठा अधिकारी, पोलिस)नियुक्त करण्यात येणार आहे.केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून,भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.त्यातच, रॉकेलचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार,लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थ्यास तीन लीटरप्रमाणे वाटप करणे आवश्यक असून,दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.
आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

