Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिधीअभावी घरकुलधारकांच्या स्वप्नाला तडे..!

निधीअभावी घरकुलधारकांच्या स्वप्नाला तडे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-घरकुल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप निधी न मिळाल्याने अनेकांचे घरकुल बांधकाम रखडले आहेत. घरकुल मंजूर होऊनही निधी वितरित न झाल्यामुळे अनेक गरजू कुटुंब आजही कच्च्या,मोडकळीस आलेल्या घरात वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.या लाभार्थ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.काहींना घरकुलासाठी आवश्यक असलेला पहिला हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम सुरू करता येत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे,तर काहींना पहिला हप्ता मिळाला असून दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम रखडले आहे.विशेष म्हणजे,काही लाभार्थ्यांनी कर्ज काढून पाया खोदकाम केले असतांना निधीअभावी काम अर्धवट अवस्थेत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेकांच्या स्वप्नाला तडे जात आहेत.बरीचशी घरकुल बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने राहायचे कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.सरकार गरिबांसाठी घरकुल योजना राबवत असतांना प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना निधीअभावी वंचित राहावे लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!