- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात रानटी(जंगली)हत्तींमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, पोर्ला येथील शेतकरी गजानन डोंगरवार यांच्या शेतातील पिकांचे जंगली हत्तींनी धुडगूस घालून नुकसान केले होते.अशातच वन विभागाच्या दुर्लक्षतेने नुकसानभरपाई मिळण्यास विलंब झाल्याने डोंगरवार यांनी काल,गुरुवार १ मे ला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.या निवेदनाची दखल घेत सहपालकमंत्र्यांनी वन विभागाला तात्काळ संबंधित अर्जावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार,वन विभागाने डोंगरवार यांना नुकसान भरपाई मंजूर करत तासाभरातच मदतीचे आदेश जारी केले.
या पार्श्वभूमीवर डोंगरवार यांनी विश्रामगृह येथे सहपालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की,’वन विभागाने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती अधिक संवेदनशील राहावे आणि त्यांना शासकीय मदत तत्काळ द्यावी.’
- Advertisement -

