- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-उद्यापासून इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा, महाशिवरात्री यात्रा व शासकीय शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात गुरुवार ५ फेब्रुवारीपासून ते येत्या,गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.या कालावधीत शस्त्रे,दाहक/स्फोटक पदार्थ,दगडफेक साधने बाळगणे,आवेशपूर्ण भाषणे,आक्षेपार्ह प्रदर्शन, तसेच पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका,सभा किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव यावर बंदी आहे.सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील,असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
- Advertisement -

