- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून जमीन विक्रीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली यांनी यासंदर्भात अधिकृत आवाहन केले आहे.या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी हक्काची जमीन उपलब्ध करून देणे हा आहे.या अंतर्गत: पात्र कुटुंबाला ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन शासनामार्फत १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. ही जमीन शासन संबंधित जमीन मालकाकडून(विक्रेत्याकडून)खरेदी करून लाभार्थ्यांना प्रदान करते.ज्या शेतकऱ्यांना आपली जमीन या योजनेसाठी विकायची आहे,त्यांनी खालील कागदपत्रांसह आपला प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.जमिनीचा ७/१२ उतारा.जमिनीचा नकाशा.धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशील(नमुना ८-अ)जमीन मोजणी “क” प्रत.गाव नकाशा.१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (शपथपत्र).इच्छुक जमीन मालकांनी आपला सविस्तर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,गडचिरोली’ येथे सादर करावा.सदर कार्यवाही शासन निर्णय दिनांक-१४ ऑगस्ट २०१८ नुसार केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी वरील कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.सचिन मडावी(सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली) यांनी केले आहे.
- Advertisement -

