Friday, April 17, 2026
Homeसांगलीबारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आत्महत्या..

बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
सांगली :-दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर असतांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच बारावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना सांगलीच्या मिरज येथे घडली.
प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय १८ वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्रथमेश बिराजदार काल सोमवारी रात्री खासगी क्लासवरून घरी परतला.क्लासमध्ये बारावीच्या परीक्षेला सामोरे कसे जायचे? याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.घरी आल्यानंतर त्याने आपल्या बहिणीसोबत गप्पागोष्टी मारल्या.त्यानंतर अभ्यास करण्यासाठी तो दुसऱ्या खोलीमध्ये गेला.रात्री ९ च्या सुमारास त्याची बहिण जेवणासाठी बोलावण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेली.तिथे प्रथमेश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. भावाला लटकलेल्या अवस्थेत पाहून बहिणीने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर त्याचे आई-वडील तिच्या दिशेने धावले.त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने प्रथमेशला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.प्रथमेश बारावीमध्ये शिकत होता.त्याचा आज पहिला पेपर होता.पण तत्पूर्वीच काल सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कां केली? अद्याप कळू शकले नाही; मात्र त्याने परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!