- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
सांगली :-दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर असतांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच बारावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना सांगलीच्या मिरज येथे घडली.
प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय १८ वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्रथमेश बिराजदार काल सोमवारी रात्री खासगी क्लासवरून घरी परतला.क्लासमध्ये बारावीच्या परीक्षेला सामोरे कसे जायचे? याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.घरी आल्यानंतर त्याने आपल्या बहिणीसोबत गप्पागोष्टी मारल्या.त्यानंतर अभ्यास करण्यासाठी तो दुसऱ्या खोलीमध्ये गेला.रात्री ९ च्या सुमारास त्याची बहिण जेवणासाठी बोलावण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेली.तिथे प्रथमेश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. भावाला लटकलेल्या अवस्थेत पाहून बहिणीने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर त्याचे आई-वडील तिच्या दिशेने धावले.त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने प्रथमेशला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.प्रथमेश बारावीमध्ये शिकत होता.त्याचा आज पहिला पेपर होता.पण तत्पूर्वीच काल सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कां केली? अद्याप कळू शकले नाही; मात्र त्याने परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

