Saturday, May 30, 2026
Homeरत्नागिरीपत्रकार वारीशे हत्या प्रकरणी; कुटुंबाला २५ लाख व मुलाला सरकारी नोकरी

पत्रकार वारीशे हत्या प्रकरणी; कुटुंबाला २५ लाख व मुलाला सरकारी नोकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 
रत्नागिरी :
 राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे.विरोधी पक्षांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शनिवारी एसआयटी चौकशीची घोषणा केली.आता वारीशे यांच्या कुटुंबाला सरकारने आज मदतीची मोठी घोषण केली आहे.

शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे.या सगळ्या धक्कादायक जीवघेण्या प्रकरणात वारीशे यांचे कुटुंब कोलमडून पडले आहे.त्यांच्या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी लावून धरत वास्तव जगासमोर आणले आणि कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला.अखेर आज या मागणीला यश आले आहे.राज्य सरकारने वारीशे यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी घेण्यात येईल; अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!