उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
उपक्रमाचे एकविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३३ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री कु.प्रियंका ठाकरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “बोल कळावे जोडीदारास” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
कु.प्रियंका ठाकरे या गांधीनगर (ता.देसाईगंज(वडसा), जिल्हा-गडचिरोली) येथील रहिवासी असून नवोदित कवयित्री आहेत.५० च्या जवळपास कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांचे दै.देशोन्नती व इतर वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.एखाद्या संस्थेतर्फे पुरस्कृत होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.त्या बी.ए.च्या तृतीय वर्षाला शिकत आहेत .
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
एकविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने मुरलीधर खोटेले,जयराम धोंगडे,वंदना सोरते,भिमानंद मेश्राम, नरेंद्र गुंडेली,संतोष पाटील,मनिषा हिडको,सोनू अलाम,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,तुळशीराम उंदीरवाडे, प्रभाकर दुर्गे,सुजाता अवचट,पांडूरंग मुंजाळ,डॉ.मंदा पडवेकर,कु.मंदाकिनी चरडे,रेखा दिक्षित,प्रब्रम्हानंद मडावी,मनोहर दुधबावरे,रोशन येमुलवार,नागोराव सोनकुसरे,पुरुषोत्तम दहिकर,संतोष कपाले,विलास जेंगठे,प्रियंका ठाकरे,उपेंद्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,चरणदास वैरागडे,गजानन गेडाम,संजय बन्सल,मधुकर दुफारे,संगीता अनील धोटे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

