Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे खत लिंकिंग करणाऱ्या वितरकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे खत लिंकिंग करणाऱ्या वितरकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात काही प्रमुख खत वितरक चढ्या दराने खतांची विक्री करत असल्याच्या आणि खत लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अशा वितरक आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी खत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच मोठे आणि लहान वितरक यांच्यासोबत जिल्ह्यातील खतांची उपलब्धता आणि वितरणाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गोकूल,सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन,रणजित यादव,नमन गोयल आणि कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात खतांची उपलब्धता सुरळीत राहावी याची दक्षता घेण्याचे आणि शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी अवंटीत केलेले खत पूर्णपणे याच जिल्ह्यात उपलब्ध झाले पाहिजे आणि ते इतरत्र जिल्ह्यात वळविण्यात आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या.खतांची सध्याची मोठी मागणी लक्षात घेता, बफर स्टॉकमधील खत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.शेतकऱ्यांवर मागणी नसतांनाही अनावश्यक इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती करू नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच खत कंपन्यांनी खतांच्या रॅक कधी लावल्या जातील,याची पूर्वसूचना प्रशासनाला द्यावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!