Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीआधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ...

आधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यामार्फत जिल्ह्यातील रिक्त महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने आधार नोंदणी संचांचे वितरण करण्यात येत आहे.माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या संचांच्या आधारे, गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३१ महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
या सुविधेसाठी “आपले सरकार सेवा केंद्र चालक” (महा-ई सेवा केंद्र चालक) यांच्याकडून यापूर्वी २७ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र,अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून आता ९ मे २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
यासंदर्भात जाहीरात,रिक्त महसुल मंडळांची यादी व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर www.gadchiroli.gov.in उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक केंद्र चालकांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!