Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीअसत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे 'दसरा'….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची...

असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे ‘दसरा’….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आजही कायम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे.यंदा २४ ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले.हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो.या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते.या परंपरेनुसार शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार. मंदिरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा

दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना,आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की,दारात त्यांची पत्नी किवा बहीण त्यांना ओवाळीत असे.यानुसार दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची परंपरा सुरू झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!