Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीनवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे...- वनवासी...

नवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे…- वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- नवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याने विहित केलेले निकष आणि कार्यपद्धती काटेकोरपणे पाळली पाहिजे; असा प्रस्ताव अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या उज्जैन येथे पार पडलेल्या बैठकीत पारित करण्यात आला.त्यानुसार आज १३ एप्रिल २०२३ रोजी वनवासी कल्याण आश्रम जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.

केवळ विशिष्ट प्रथा किंवा भिन्न बोली भाषेमुळे अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही जातीचा किंवा गटाचा समावेश करू नये, तर लोकूर समितीच्या सर्व पाचही मापदंडांची पूर्तता करणे आवश्यक आहे.अन्यथा,ज्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातींची अनुसूची, अनुसूचित जाती,भटक्या जमाती आणि इतर मागास जाती यापेक्षा वेगळी बनविण्यात आली, त्याला काही अर्थ उरणार नाही, असेही केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या ठरावात नमूद करण्यात आले. आदिम लक्षणांची चिन्हे, विशिष्ट संस्कृती, भौगोलिक वेगळेपण, व्यापक इतर समुदायांशी संपर्क साधण्यात संकोच आणि सामाजिक व आर्थिक मागासलेपण असे लोकुर समितीचे पाच निर्धारित मापदंड आहेत. मात्र, तात्कालिक राजकीय फायद्यामुळे आणि प्रबळ समाजाच्या दबावाखाली, अनेक विकसित, संपन्न अशा जातींना विहित निकषांना बगल देऊन अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट केले जात असल्याचे लक्षात येते.याकडे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने लक्ष वेधले आहे.

नवीन जातींचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करताना, सर्व वैधानिक व कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन व्हावे तसेच आदिवासी समाजाला, विशेषतः या समाजातील सामाजिक-राजकीय नेते, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि युवकांनी याबाबत जागरूक राहून समाजात जनजागृती करावी, शासनावर दबाव निर्माण करावा आणि सर्व घटनात्मक मार्गांनी यास विरोध करावा, असे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने आपल्या ठरावातून केले आहे.यामुळे अनुसूचित जमातीच्या घटनात्मक अधिकारांचेही रक्षण होणार असून,जनजाती भागातील संताप व अशांतता दूर होईल,असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे.यावेळी जनजाती सुरक्षा मंच चे प्रांत मंत्री प्रकाश टी.गेडाम,गडचिरोली जिल्हा संघठन मंत्री अजय केदार,अहेरी जिला संघटन मंत्री राजु कोडागुर्ले,प्रसार प्रचार प्रमुख संतोष सुरपाम उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!