उद्रेक न्युज वृत्त
बिहार :- बिहारच्या बक्सर घाटात वास्तव्यास राहणारे मनीष गुप्ता पेशाने वकील असून १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा वाढदिवस व त्या दिवशी गणेश चतुर्थीचाही योग होता.त्यानिमित्ताने त्यांची आई व परिवारातील सदस्यांना त्रास होऊ नये; याकरिता रेस्टॉरंट या ठीकानाहून काहीतरी घरपोच ऑर्डर करून खावे; अशी त्यांची इच्छा झाली.त्यानुसार त्यांनी नमक रेस्टॉरंट येथून मसाला डोसा ऑर्डर करून घरी नेला असता ऑर्डर चे पॉकीट उघडताच त्यात मसाला डोसा सोबत सांबर दिसून आले नाही.घरातील सदस्य व इतर पाहुणे त्यावर हसू लागल्याने दुसऱ्या दिवशी मनीष गुप्ता यांनी रेस्टॉरंट मॅनेजरला खडेबोल सुनावले असता मॅनेजरने उध्दटपणे उत्तर देऊन १४० रुपयांना तू सर्वच रेस्टॉरंट विकत घेशील काय? असे उत्तर दिले.
पेशाने वकील असलेल्या मनीष गुप्ता यांनी रेस्टॉरंट ला कायदेशीर नोटीस बजावल्या नंतरही कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद न मिळाल्याने गुप्ता यांनी अखेर जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली व न्याय मिळण्याची दाद मागितली.त्यानुसार तब्बल ११ महिन्यांच्या कालावधी नंतर आयोगाने सर्व बाजू ऐकून गुप्ता यांच्या बाजूने जुलै २०२३ रोजी निकाल दिला व रेस्टॉरंटला दोषी ठरवून ग्राहकाला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी ३५०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहे.४५ दिवसांत पैसे न दिल्यास ८% व्याजासह रक्कम वसूल करण्यात येणार असेही फर्मावीले आहे.