उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे.त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजन्सीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.प्रक्रिया न केल्यास ग्राहकाला प्रति सिलिंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद होणार आहे.
सध्या गॅसधारकाला संबंधित एजन्सीकडून तसे संदेश मोबाइलवर येत आहेत.ग्राहकाला (गॅस जोडणी ज्याच्या नावाने असेल) ई-केवायसी करण्यासाठी त्याच्या एलपीजी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल.येथे येताना लाभार्थ्यांचा मोबाइल व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे.सदर कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया एजन्सीकडून केली जाईल.त्यानंतर ग्राहकाला परत जाता येईल.दरम्यान ही ई-केवायसी प्रक्रिया न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर वितरण व अनुदानही बंद होऊ शकते.
एखाद्या ई-केवायसी न केलेल्या ग्राहकासोबत असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये जाऊन ही प्रक्रिया नंतरही करू शकतो.गॅस कंपनीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरू होईल.ग्राहकांनी त्यांच्या गॅस जोडणीची सुरक्षा तपासणीही करून घेणे अनिवार्य आहे.दरम्यान ई-केवायसीमुळे तुमचा मोबाइल क्रमांक बदलला आहे.तो तात्काळ अपडेट होईल,जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर करता येईल. गॅस जोडणीमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येणार आहे.

