Tuesday, April 22, 2025
Homeगडचिरोलीअशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई...- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..
spot_img

अशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई…- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी चिखलनी केल्या नंतर धानपीक वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते.कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे.परंतु यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करतांना दिसून येतात.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खते,बियाणांची मागणी लक्षात घेता काही कृषी केंद्र चालक अतिरिक्त दराने खताची विक्री करुन शेतकऱ्यांची लूट करीत असतात.मात्र शेतकरी बांधव संबंधित कृषी केंद्र चालकांची तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नाही.कारवाई साठी शेतकरी बांधवांनी सामोरे येण्याची गरज आहे.अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे,भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसतांना निविष्ठा विक्री करणे,साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे,फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे,बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर,उत्पादनाची तारीख न लिहिणे आदी न आढळल्याने कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी...

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण...

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!