Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीअशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई...- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..

अशी होणार कृषी केंद्रांवर कारवाई…- शेतकरी बांधवांनी न घाबरता करावी तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी चिखलनी केल्या नंतर धानपीक वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते.कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे.परंतु यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करतांना दिसून येतात.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खते,बियाणांची मागणी लक्षात घेता काही कृषी केंद्र चालक अतिरिक्त दराने खताची विक्री करुन शेतकऱ्यांची लूट करीत असतात.मात्र शेतकरी बांधव संबंधित कृषी केंद्र चालकांची तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नाही.कारवाई साठी शेतकरी बांधवांनी सामोरे येण्याची गरज आहे.अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे,भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसतांना निविष्ठा विक्री करणे,साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे,फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे,बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर,उत्पादनाची तारीख न लिहिणे आदी न आढळल्याने कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!