Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीआता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

आता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.त्यातून बनावट मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल; असा राज्य सरकारचा दावा आहे.

ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र, धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे.त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे.मात्र,एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षांपूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी आधार अपडेट करावे लागणार आहे.त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!