Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीआता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

आता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.त्यातून बनावट मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल; असा राज्य सरकारचा दावा आहे.

ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र, धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे.त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे.मात्र,एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षांपूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी आधार अपडेट करावे लागणार आहे.त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!