Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीआता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

आता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.त्यातून बनावट मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल; असा राज्य सरकारचा दावा आहे.

ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र, धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे.त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे.मात्र,एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षांपूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी आधार अपडेट करावे लागणार आहे.त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!