Wednesday, June 10, 2026
Homeनाशिकलग्नासाठी केली बस; लग्नाची वेळही गेली निघून, नवरदेवाची वाट पाहू-पाहू दमेजून गेली...

लग्नासाठी केली बस; लग्नाची वेळही गेली निघून, नवरदेवाची वाट पाहू-पाहू दमेजून गेली नवरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नाशिक :- राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या नांदगाव येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नाचा मुहूर्त टळला.नांदगाव येथील सतीश बिडवे यांचे मुलाचे लग्न संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात  बाबरा येथील तरुणीसह ठरले होते.सहलींसह विविध समारंभांसाठी एसटी बसेस भाडेतत्वावर दिल्या जातात.बिडवे यांनी लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेवून जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने बुक केली होती.आगाराने चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे पोहचली.यामुळे बस चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बस एक तास उशिराने  निघाली.साधारण ५० किलोमीटर अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली.यामुळे वऱ्हाडी संतापले.बस दुरुस्त करण्यासाठी अडीच तिथेच ताटकळत बसावे लागले.अडीच तासा नंतर पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली.या सगळ्या वेळात लग्नाचा मुहूर्त निघून गेला.लग्नाचा मुहूर्त चुकल्याने बिडवे परिवारासह वऱ्हाडी मंडळीना मनस्ताप सोसावा लागला तर नवरदेवाची वाट पाहू-पाहू नवरी दमली होती.बसच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त ही गेला आणि सर्वांना मनस्ताप सोसावा लागला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!