Monday, December 8, 2025
Homeगडचिरोली३४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या नक्षलवाद्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण...

३४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या नक्षलवाद्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम वय ४२ वर्षे याने आज,शुक्रवारी ३० ऑगस्टला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
केदार नैताम हा धानोरा तालुक्यातील कोसमी क्रमांक- १ येथील रहिवासी आहे.२००२ मध्ये तो टिपागड दलममध्ये भरती झाला.२००७ पासून तो उत्तर गडचिरोली विभागाच्या तांत्रिक समितीचा सदस्य झाला.२०१२ पासून २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक- १५ मध्ये कार्यरत राहिला.त्यानंतर त्याची एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती झाली.सध्या तो पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य म्हणून काम पाहत होता.
त्याच्यावर चकमकीचे १८,जाळपोळीचे ३,खुनाचे ८ आणि अन्य ६ अशा एकूण ३४ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.२०२२ पासून आतापर्यंत २५,तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६७३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे; असे आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन.. – विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या,सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपुरात सुरू होत आहे.राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान...

‘उपजीविका विकास’ प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत आधार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी 'एकात्मिक उपजीविका विकास' प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.बायफ(BAIF)डेव्हलपमेंट...

मामाच्या मुलासोबत गावात नाटक पाहायला गेली अन् त्याच रात्री १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची प्रमुख कारणे ही वेगवेगळी असू शकतात.मात्र, सध्या स्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुली...

देशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. – दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे.तलवार,बंदूक,हत्या व इतर अपराधिक सीमा ओलांडल्या जात आहेत.पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!