Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर दुसऱ्यांदा धान खरेदीला मुदतवाढ... - 'या' तारखे...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर दुसऱ्यांदा धान खरेदीला मुदतवाढ… – ‘या’ तारखे पर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य सरकारच्या पणन विभागाने किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता १५ जानेवारी २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार असून, किमान आधारभूत दराने धानाची विक्री करता येणार आहे.
गडचिरोली,भंडारा,गोंदिया,नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी राज्य सरकारच्या वतीने एमएसपी(किमान आधारभूत किंमत)दरात धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.सन २०२४-२५ च्या विपणन हंगामासाठी सुरुवातीला १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत दिली होती.या काळात कमी नोंदणी झाल्याने तसेच काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याने नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.शासकीय धान खरेदीने अजूनही पाहिजे तसा वेग न घेतल्याने या नोंदणीला दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून किमान आधारभूत दराने सरकारला धानाची विक्री करता येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!