Monday, December 15, 2025
Homeनागपूरवाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण जाहीर केले आहे.त्यानुसार वाळू घाटाचे पूर्वीप्रमाणेच लिलाव केले जातील.नव्या धोरणात ६०० रुपये ब्रास हा शासन दर असला तरी लिलावात नेमकी किती बोली लागते. त्यानुसार इतर सर्व गोष्टी विचारात घेऊनच रेतीचे दर ठरवले जातील.काही ठिकाणी पर्यावरण मंजुरी नसल्याने वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे नवीन धोरणाप्रमाणे रेतीच्या दरासाठी वाट पाहावी लागणार आहे.जोपर्यंत पर्यावरणाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत वाळूचे उत्खनन करता येत नाही. परिणामी लिलावही करता येत नाही.काही ठिकाणी वाळू डेपोतील वजन काट्यात भांजी मारली जात आहे.नियमानुसार वाळूचे उत्खनन केल्या जात नाही,अश्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!