- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-हवामान खात्याने आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अश्यातच मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये-अंधेरी, बोरिवली,मालाड,कांदिवली आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.बेस्ट बस सेवा आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला असून नागरिकांनी प्रवास करतांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.आज राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून यात चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर,भंडारा,वर्धा,यवतमाळ,अमरावती,सिंधुदुर्ग,नाशिक,पुणे,सातारा,कोल्हापूर,बीड,लातूर,नांदेड, पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी,धाराशिव,परभणी, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.या सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
- Advertisement -

