- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ओडिसा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली(रानटी) हत्तींनी जणूकाही जिल्ह्यातील जंगलांचा ताबाच घेतलेला आहे; असे वाटत आहे.गेल्या तीन वर्षांपासून जंगली हत्ती जिल्ह् यातील वेगवेगळ्या वन विभागात भ्रमंती करीत आहेत.जंगली हत्तींनी जंगल परिसराला आपले अधिवास बनवले आहे.कुठे महिनाभर तर कुठे पंधरा दिवस राहून परत पुन्हा घुमजाव करीत शेतकऱ्यांच्या विविध पिकांची नासधूस करून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे,असे करतांना दिसून येतात.जंगली हत्तींमुळे वन विभागासह शेतकरी बांधव ‘हत्ती आले रे पळा-पळा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अश्यातच पोर्ला वन परिक्षेत्रात तीन महिने उपद्रव माजविणाऱ्या जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव,डोंगरगाव व पिंपळगाव परिसरात एंट्री केल्याने शेतकरी तथा परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी काल,रविवार १७ मे पासून जंगली हत्तींच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपात जवळपास २० ते २५ हत्ती असून त्यावर दोन दिवसांपासून पाळत सुरू आहे.सध्या देसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींनी एंट्री केल्याने भ्रमंती करीत असतांना हत्तींकडून वाटेत येणारी घरे आणि शेतपिकांचे नुकसान होऊ नये,याची खबरदारी घेण्यात येत आहे.
कैलास धोंडणे,वन परिक्षेत्र अधिकारी देसाईगंज👇
आम्ही वन विभागाच्या संपूर्ण टीमसह हत्तींवर पाळत ठेवून आहोत.खबरदारी म्हणून नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये,हत्ती नजरेस पडल्यास दगड मारणे वा त्यांना हिनवू नये.हत्तींच्या हालचालींवर वनविभागाची करडी नजर असून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

