उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच ५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यंदाही बारावीत मुलींनी बाजी मारत ‘हम किसिसे कम नहीं’ करून दाखवले आहे.अशातच आता दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.अद्याप शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नसून दहावीचा निकाल १५ मे पर्यंत येऊ शकतो.बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल,असे सांगण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता आहे.अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या १९ मे पासून सुरू होणार आहे.शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.पोर्टलवर शाळांसाठी आवश्यक असलेली माहिती भरण्याची प्रक्रिया कालपासून म्हणजेच गुरुवार ८ मेपासून सुरू झाली आहे.तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा येत्या १९ मे पासून सुरू होईल.
आता दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता.. – अकरावीची प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES